Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

भाग अंतिम :- 5 पितामह भीष्माचार्यः संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)

PITAMAH BHISHMA SAMPURN CHARITRA KADAMBARI MINAKSHI DESHMUKH BHAG 5 96 KULI MARATHA SURYAVANSH

PITAMAH BHISHMA SAMPURN CHARITRA KADAMBARI MINAKSHI DESHMUKH BHAG 5 96 KULI MARATHA SURYAVANSH

पितामह भीष्माचार्यः ही चरित्र लेखमाला मीनाक्षी देशमुख संकलित संपूर्ण चरित्र अर्थात (कादंबरीरुपात) या लेखमालेचे एकूण २५ भाग असून येथे वाचण्यासाठी सोपे व्हावे म्हणून मूळच्या ५ भागाचा १ भाग बनविला आहे. याची नोंद घ्यावी.
Part:-1 Pitamah Bhishmacharya: Complete Biography (Novel Form), Pitamah Bhishma Complete Biography

पितामह भीष्म संपूर्ण चरित्र

भीष्म पितामह

भाग-२१

तिसर्‍या दिवशी भीष्मांनी गरुड व्यूह रचला. चोचीच्या जागी ते स्वतः उभे राहिले. त्यांना शह देण्यासाठी पांडवांनी अर्धचंद्राकार उभं केलं. संकुलयुध्द सुरु झालं. त्यात दुर्योधन शिरल्यावर घटोत्कचानं त्याला मुर्च्छीत केलं. कौरवांची पळापळ सुरु झाली. दुर्योधन शुध्दीवर आल्यावर भीष्मांची कानउघाडणी केल्यामुळे ते पेटुन उठले. अग्नित कृमीकिटक पडावेत त्याप्रमाणे पांडवसेनेचं होऊ लागले. भीष्माच्या अतुलनीय शस्रकौशल्याने कृष्ण सुध्दा स्तंभीत झाला ! भीष्मांचा मृत्यु म्हणुन जन्मास आलेला शिखंडी बघ्याची भूमिका घेऊन पाहत उभा होता.

अर्जूनाचा रथ आलेला पाहुन त्यांनी बाणांनी रथ झाकुन टाकला. त्यांनी अपार शरसंधान करुन अर्जुनासह कृष्णालाही विध्द केलं. अर्जुन त्यांचे बाण फक्त परतवत होता. भीष्म श्रीकृष्णाला “मी हाती शस्र धरणार नाही” ही प्रतिज्ञा सारखी आठवण देत होती. पांडवसेनेची वाताहत होत होती. अर्जुनावर इतर योध्देही तुटुन पडले ! उद्वेगाने कृष्णाने अश्वरश्मी हवेत झीडकारुन तीथे पडलेल्या भग्न रथाचे चक्र हाती घेऊन भीष्मांच्या दिशेने धावला. भीष्म धनुष्य ताणुन नेत्रपल्ल हलतात त्याहीपेक्षा वेगाने शरसंधान करीत होते, या योध्याला वृध्द म्हणावं का ?

श्रीकृष्ण भीष्मांकडे येतांना पाहुन त्यांनी धनुष्य खाली ठेवलं. हस्तप्रक्षालन आणि आचमण घेऊन नेत्रपल्लव ओले केले नी हात जुळवत खड्या स्वरात म्हणाले, “ये, ये जगन्निवासा ! माधवा !! हे चक्रपाणे ! मजकडे ये ये ! हा मी वंदितो तुज लोकपाणे !! हे शरण्या ! करुणा करा !!” भीष्मांच्या आर्त स्वरांनी सर्व स्तब्ध व थक्क होऊन अलौकीक दृष्य पाहत होते.

द्रोण, विकर्ण, सोमदत्त आणि कृतकर्म्याला आक्रमण करणार्‍या उग्र कृष्णाच्या नेत्रात आकाशाचा नीलीमा गडद झालेला दिसत होता. भीष्मांच हे वेडं रुप पांडव वीरांना सम्रभरात टाकुं लागल ! आणि भीष्म ! रथावरुन अत्यंत निर्भयतेने पण विनयानं म्हनत होते __ “ये ये !! नरसिंह देवा ! वामणदेवा !! ये ! ये! परशूरामा ! रेणुकानंदनि !! ये ! ये! श्रीरामा ! दशरथनंदना !! ये ! ये! यादवेंद्रा ! गोविंदा ! कृपावंता ! ओढी मज या भूमीवर ! निर्दाली मज क्षणात आज ! मी असेन धन्य जर वधशील मज ! तीनही भुवनीचा मी किर्तिवंत !!!”

अर्जुनाने श्रीकृष्णाला कसंबसं शांत केले. सर्व युध्दकामार्य रथारुढ झालेत. अर्जूनाने महेंद्रास्राचा प्रयोग करुन कौरवसेनेची दाणादाण उडवुन दिली. अर्जुनाने महेंद्रास्राने नामोहरण केल्यानं त्यांच्यातल्या विजिगीष्ट योध्याला पचनी पडेना !

चवथ्या दिवशी भीष्मांनी तुंबळ युध्ध सुरु केले. भीष्म आणि अर्जुनचे द्वैरथ युध्द सुरु झाले. दोघेही घात प्रतिघात करुन शस्रकौशल्य दाखवु लागले. भीष्मांना पांडवांना मारायचं नव्हतं आणि कौरवसेनाही घटवायची नव्हती. म्हणुन सुर्यास्तापुर्वीच युध्द समाप्तीचा शंख फुंकला !

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख.

भीष्म

भाग-२२

पांचव्या दिवशी कौरवांनी मकरव्यूह आणि पांडवांनी श्येनसंज्ञक व्यूह रचला. श्येनपक्षाच्या मुखस्थानी गदाधर भीमाने मकरव्यूह फोडुन भीष्मांवर बाणांचा वर्षाव सुरु केला. नाइलाजाने भीष्मांनी वायव्यास्राचा प्रयोग करुन बहिरी ससानासारखा दिसणारा व्यूह फोडुन सात्यकीला रेटत पक्षाच्या पोटात शिरले. त्यांना आवरणं कठीण झालं. अशात ताज्या दमाचा शिखंडी जन्मजन्मांतरीची आग ओकत आलेला पाहुन भीष्मरथ बाजुला वळला. दुर्योधनाने शिताफीने द्रोणाचार्यांना शिखंडीसमोर आणलं. कोपलेल्या द्रोणाचार्यासमोरुन शिखंडीला पळण्याशिवाय पर्यायच नव्हता.

मध्यान्ह केव्हाच टळली होती ! धार्तराष्टांना यमसदनी पाठवणार्‍या पांडवसेनेचा समाचार घेण्यासाठी भीष्मांनी कडवं आक्रमण केलं. भीष्म आवरत नाही पाहुन कृष्णानं अर्जुनरथ भीष्मांच्या दिशेने वळवला. शरवर्षाव करीत, कौरवसेनाला मागे हटवत अर्जुन भीष्मांसमोर उभा राहिला, त्यानं एक प्रखर दिव्यास्र सोडलं. भीष्मार्जुन एकमेकांवर विविध बाणांचा वर्षाव करुं लागले. सोमदत्त आणि सात्यकीचा कोवळा मुलगा यांच्यांत चांगलीच जुंपली. सोमदत्तच्या एका लांब बाणांनी सात्यकीपुत्र आपलं मस्तक गमावुन बसला. तापलेल्या अर्जुनाने अमोध शरसंधान करुन पंचवीस सहस्र रथयोध्ये मारले. युध्दाचे भयंकर स्वरुप पाहुन भीष्मांनी युध्द थांबवण्याचे शंख फुंकले.

सहाव्या दिवशी युधीष्ठीराने मकरयुध्द तर भीष्मांनी क्रौंचव्यूह रचला. क्रौंच्याच्या मुखावर भीष्मांनी द्रोणाचार्यांची नियुक्ती केली. दोन्हीही व्यूह एकमेकांवर घात-प्रतिघात करु लागले. भीमाने अलोट पराक्रम करुनही कौरवांची सरशी झाली, मात्र दुर्योधन भीमाच्या बाणांनी विध्द झाला.

सातव्या दिवशी भीष्मांनी मंडलसंज्ञक व्यूह रचला. त्या मंडलाचे एकएक थर अद्भुत शस्र धारण केलेल्या शस्रपतींचे होते. युधीष्ठीरानं वज्रव्यूह रचला. अर्जुनाने इंद्रास्राचा वापर करुन कौरवसेना छिन्नविछिन्न केल्यामुळे भीष्मांनी निकराचं आक्रमण अर्जनावर केल. अर्जुन आवरत नाही असे पाहुन दुर्योधनाने सुशर्माला कायम अर्जुनामागे लावला. द्रोणांनी विराटपुत्र शंखला वधला. भीष्मांची शक्तीशय करणारा अर्जुन सुशर्मादी त्रिगर्तवारांमधे गुंतल्याने भीष्मांनी चौफेर शस्रफेक सुरु केली. शेवटी युधीष्ठीर भीष्मांना भिडला. घनघोर युध्द सुरु झाले. पांडवांची फजीती होत आले पाहुन युधीष्ठीराने शिखंडीला डिवचले.

शिखंडी उसळुन भीष्मांवर निघाला असतां शल्याने भीष्म-शिखंडी मधे रथ घातला. अनेक लढायांचा अनुभव असलेल्या शल्याने शिखंडीच्या त्वेषाचा धडाका देऊन शिखंडीचि त्रेधातिरपट उडवली.

भीष्म युधीष्ठीराचा धनुष्य तोड, ध्वज तोड, असं करुं लागल्यामुळे विकल होऊन युधीष्ठीर शस्र टाकुन निघुन गेले. भीम-जयद्रथाचे युध्द जुंपले, पण भीष्मपराक्रमापुढे सर्वच हतबल झाले.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

भीष्म

भाग-२३

आठव्या दिवशी भीष्मांनी महाव्यूह आणि पांडवांनी श्रृंगाठक व्युह रचला. भीमाने अत्यंत निकराने भीष्मांचा सारथी वधल्यामुळे त्यांचा रथ अनियंयत्रीत होऊन एकटे पडले. अल्पवेळेतच भीमाने आठ धार्तराष्टांचा बळी घेतले. भीष्मांनी रथ पांडवव्यूहावर घातला. अर्जुनपुत्र इरावन कामी आला. शिखंडी भीष्मांना शोधत फिरत होता. भीमाने आणखी सात धार्तराष्टांना यमसदनी पाठवले. खरं म्हणजे भीष्मांना या सर्वाचा वीट आला पण कर्तव्य सोडायचं नव्हतं !

नवव्या दिवशी भीष्मांनी सर्वतोभद्र आणि पांडवांनी अनामिक व्यूह रचला. मध्यांनीपर्यंत भीष्मांनी पांडवांचे चौदा सहस्र वीर वधले. कृष्णाने अर्जुनाला चेतवुन रथ भीष्माकडे वळवला. पण भीष्मांच्या शरजालांनी अर्जुनाचा मार्ग बंद केला. भीष्मामधे क्रुध्द यमधर्म द्रुगोच्चर होत होता.

शेवटी कृष्णाला शस्र हाती घ्यायला भीष्मांनी भाग पाडले. प्रतिज्ञेस धाब्यावर ठेवुन चाबुक घेऊन येणारा महास्रांचा महामेरु भीष्म पाहत होते. नकळत त्यांचे हात जुळले, आणि प्रार्थना करु लागले, “हे पुंडराक्षा ! येरे !ये! वंदितो तुज मी ये रे! ये! हे परमश्रेष्ठा ! ये! महारणी ! ओढुन आण ! निजवी या धाणी ! हे निर्मलदेवा! वधावे मज या रणी! धन्य होऊ दे! असेन तुझा मी ञृणी! हे गोविंद! तव कृतीनं होईन किर्तिवंत ! ये! वधावे मज निष्कलंक ! दास तुझा ! “

अर्जुनाने कृष्णाला शांतवत पुनः रथारुढ केल्यावर भीष्मांनी पुनश्च शरसंधान साधुन रणतांडव माजवुन पांडवांची अपरिमीत हानी केली.

युधीष्ठीर अत्यंत विकल होऊन कृष्णला म्हणाले, “भीष्म दुर्जेय आहेत, जो धर्म्य आहे असा” भीष्मवधाचा उपाय शोधण्यासाठी त्यांच्या मृत्युचा मार्ग त्यांनाच विचारावे म्हणुन पांडवासह कृष्ण त्यांच्या निवासाकडे निघाले. त्यांच्या राहुटीत पोहोचल्यावर युधीष्ठीराने मृत्युरहस्य विचारले असतां भीष्म म्हणाले, “हाती शस्र असतांना मी अपराजीत आहे. कालच्या किंवा आजच्या स्रीवर शस्र चालवणार नाही, असा दृपदपुत्र शिखंडी समोर आल्यास प्रतिकार करणार नाही. त्यानंतर तुमचा विजय निश्चित आहे.”

दहाव्या दिवशी भीष्मांनी व्यूह रचला. पांडवसेनेच्या अग्रभागी शिखंडी होता. घणघोर युध्द होऊन त्या दिवशीचे युध्द समाप्त झालं.

अकराव्या दिवशी भीष्मांंच्या कचाट्यात बरीचशी पांडवसेना फस्त झाली. संधी साधुन शिखंडीने तीन लांब बाण भीष्मांच्या उरांत मारलेत पण त्यांनी प्रतिकार केला नाही. भीष्मांनी अस्रशक्तीचं स्मरण करुन पांडव सैन्यात हाःहाकार माजवला. दिवस सरता सरत नव्हता. भीष्मबाणांची आग वाढत होती. शरवर्षावा बरोबर इतर शस्रांचाही सढळ वापर करीत होते. शिखंडी कुठुन कुठुन रथ पुढे दामटवत त्यांना बाण मारत होता. भीष्माच आजचं रौद्ररुप सेनापतीच्या कर्तव्याचं समर्ण करीत होते. दुर्योधन विचार करीत होता, पितामह रणभूमीतुन हटले तर त्याच जीवन आणि विजय दोन्ही संकटात सापडतील.

अर्जनाचे बाण शिखंडीच्या मागुन येणारे बाण ते परतवीत होते. भीष्म द्युष्टद्युम्नावर शरसंधान करीत असतांनाच अर्जुनाने त्यांच धनुष्य छेदलं. त्यांच्या हातातील सर्व शस्रे तो भेदीत होता. धर्युध्दाच्या सूची पायदळी तुडवल्या जात होत्या.

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख

भीष्म

भाग-२४

अर्जुनाचे गांडीव धनुष्यातले आणि इंद्रवज्राचे बाण भीष्मांच्या शरीरात घुसले. तो जर महाबली कृष्णासोबत व पांडुपुत्र नसते तर केव्हाच संपले असते. असे म्हणत थोर थोर जीवात्मे आणि वसुदेवताही आले.

वसु भीष्मांना म्हणाले, “आता युध्दातुन मन काढुन टाका” भीष्मांच्या रथातील शस्र संपली. शंभुकरनने खडःग देण्याचा प्रयत्न करताच अर्जुनाच्या बाणांनी त्याला जखडुन टाकले. शिखंडी मात्र विक्राळ हसत होता. अर्जुनाच्या बाणांनी भीष्मांच्या अंगावर बोटभरही जागा शिल्लक ठेवली नाही! कोसळता कोसळता पुर्वेकडे मुख केल्यामुळे भूमीचा स्पर्श न होता बाणांच्या शरशय्येवर निजले! ते इच्छामरणी असल्याने दक्षिणायण असल्याने प्राण रोखुन धरला.

भीष्मानी महोपनिषदात सांगीतलेल्या योगमार्गाचा अवलंब केला. असह्य वेदना असुनही औषधचिकित्सा नाकारली. मान लटकत होती म्हणुन अर्जुनाने नतपर्व बाण सोडुन त्यांच्या मस्तकाला आधार दिला. उत्तरायणापर्यंत जीवित राहणार होते. त्यांना तहान लागली म्हटल्यावर अर्जुनाने भात्यातुन एक तेजस्वी बाण काढुन पर्जन्यास्राने अभिमंत्रीत करुन जमीनीत मारल्याबरोबर पृथ्वीतुन दिव्य जलाची धार सरळ त्यांच्या तोंडात पडल्याने अमृतमय पाणी पिऊन भीष्म तृप्त झाले. नंतर त्यांनी अन्न-जलाचा त्याग केला. जेवढे दिवस जिवंत होते तितके दिवस असह्य शरपिडेसहित तहान भूकेच्या वेदनाही सोशीत वीरतेसोबत धैर्य आणि सहनशक्तीची पराकाष्ठा केली.

सर्वीकडे निस्तब्धता झाल्यावर शंभुकरणने कर्ण येत असल्याचे सांगीतल्यावर एकांताची आज्ञा केली. कर्णानं भीष्माच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि आर्द स्वरात म्हणाला, “हे पितामह माझेकडुन आपल्यासारख्या लोकोत्तर पुरुषाचा अनेकवेळा अवमान झाला. उदार मनाने क्षमा करुन आज्ञा द्यावी.”

ते म्हणाले, “तुझं जन्मरहस्य नारद आणि व्यासांनी फार पुर्वीच सांगीतले होते, त्यांनी त्याला युध्दापासुन परावृत्त करायचा प्रयत्न केला परंतु मैत्रीशी द्रोह करु शकत नाही म्हणुन नम्रपणे नकार दिला. त्यांनी धर्माला अनूसरुन युध्द करावे असा आशिर्वाद दिला.”

अकराव्या दिवशी द्रोणाचार्य सेनापती झाले. पंधराव्या दिवशी कुटनितीने त्यांचा मृत्यु झाला. सोळाव्या दिवशी कर्ण सेनापती झाल्यावर सतराव्या दिवशी त्याचाही वध झाला. अठराव्या दिवशी रात्री अश्र्वत्थामाने पांच पांडव सोडुन सर्वांचा निर्घुण वध केला. हे ऐकुण भीष्म फार व्यथीत झाले, त्यांना ग्लानी आली.

श्रीकृष्ण त्यांना भेटीस आला असतां भीष्मांनी विचारले, “माधवा ! या जन्मी तर कोणतेही अनुचित, वाईट कर्म केले नसतांना सुध्दा ह्या शरयातना का ?”

त्यावर कृष्ण म्हणाले, “मागच्या जन्मी अचानक एक नाग रस्त्यात आला असतां मागुन येणार्‍या सैन्याकडुन कुचलुन जाऊं नये म्हणुन त्याला उचलुन फेकल्यावर तो काटेरु झुडपावर पडला, त्याला झालेल्या यातना झाल्यात, आता तुम्हाला पुर्नजन्म नसल्यामुळे पुर्ण मोक्ष मिळावा म्हणुन, कर्म कोणत्याही उद्देशाने असो, भोग भोगुन द्यावेच लागतात.”

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख

भीष्म

*अंतिम भाग-२५*

भीष्म विकलांग अवस्थेत शरशय्येवर पडले होते. सर्व आप्त-स्वकीयांचा झालेला संहार पाहुन ते अतिशय दुःखी झालेत. त्यांच्यासमोर सर्व कुरुसम्राज्य नष्ट झालेले पाहुन अतिशय विकल झालेत. महात्मा भीष्म, आदर्श पित्रृभक्त, सत्यप्रतिज्ञ आणि वीर होते. एवढेच नव्हे तर महान ज्ञाते, धर्म आणि इश्वराच्या तत्वाला जाणणारे महान भगवद् भक्त होते. त्यांच्या जाण्याने जगातील ज्ञान लुप्त होईल. जे संदेहग्रस्त विषय आहे त्याचे समाधान दुसरं कोणी करुच शकत नाही. श्रीकृष्णाच्या प्रेरणेने भीष्मांनी युधीष्ठीराला वर्णाश्रम, राजधर्म, आपद् धर्म, मोक्षधर्म, श्राध्दधर्म, दानधर्म, स्रीधर्म अशा अनेक विषयांवर उपदेश केला.

युधीष्ठीराला जे विष्णुसहस्र नाम ऐकवले त्यावरुन त्यांची भगवद भक्ती आणि भागवत तत्वाचे ज्ञान दिसुन येते. त्यांच्या भक्तीमुळे साक्षात भगवान कृष्णांनी दर्शन देऊन कृतार्थ केले. अशाप्रकारे भक्ती, ज्ञान, सदाचार इ. कोनातुन आदर्श भीष्मचरित्र्य दिसुन येते.

भगवान श्रीकृष्णांचे महात्म्य आणि प्रभावाचे ज्ञान जसे भीष्मांना होते तसे फार कमी लोकांना होते. त्यांनी धृतराष्ट आणि दुर्योधनाला अनेकदा श्रीकृष्ण महिमा ऐकवला, राजसूय यज्ञाच्या वेळी कृष्णाला सर्वोत्तम ठरवून अग्रपुजेचा मान दिला. अर्जूनरक्षणासाठी कृष्ण जेव्हा रथचक्र घेऊन धावला तेव्हा भगवंताच्या हातुन मृत्यु येण्यात गौरव मानुन शस्राद्वारे पुजा करुन आवाहन केले.

भीष्मांच्या तोडीचा महापुरुष जगात विरळच! जरी भीष्म निपुत्रीक होते तरी त्रेवर्णिक हिंदु अजुनही पितरांचे तर्पन करतांना त्यांना सुध्दा पाणी देतात. असा गौरव भारताच्या इतिहासात कुणालाच मिळाला नाही. म्हणुनच आजही सगळं जग त्यांना पितामह म्हणतात. भीष्म निपुत्रिक असुनही भल्या भल्या पुत्रवंतांनि इर्षा वाटते.

भीष्मांनी सहस्रनामावली उच्चारायला सुरुवात केली. सर्व मंत्रमुग्ध झाले. स्वर-मंडलात देवी शारदा वीणा झंकारत असावी असे वाटत होते. स्वतेजाने तळपणारा दिनमणी उत्तरेकडे वळला. उत्तरायण सुरु झाले. त्यांची वायुदेवावर नजर स्थीर करुन अनुज्ञा मागीतली. श्रीकृष्णामधे परशुराम विसावले ! त्याचं रुप अलौकीक सुंदर दिसु लागले. मधुनच ते रुप विष्णुरुपातलं चतुर्भुज दिसु लागले. भीष्म कुरुकुलातले श्रेष्ठ पुरुष, आजपर्यंत सदाचरण, सद्वर्तनाने वागुन धर्माचरण केले. वास्तविक अष्टवसुंपेकी एक वसू अल्पायुषीच, पण उद्याच्या समाजाला आदर्श देण्यासाठु दिर्घायुषी ठरुन त्यांनु त्यांची जबाबदारी यथायोग्य पार पाडली.

भीष्मांच प्राणतत्व त्यांच्या सप्तचक्रात खोळंबत होतं आणि पुढे सरकत होतं. सगळ शरीर निःशर झालं ! ब्रम्हरंघ्रातुन उल्का बाहेर पडावु तसं तेज बाहेर पडल्याचं सर्वांनि जाणवलं. शेवटच्या क्षणु त्यांच्या मुखातुन ” *वासुदेवाय नमः* !” उद्ग्गार बाहेर पडला. सर्व संपलं. घराघरातल्या चुली पुनः विझल्यात.

*समाप्त*

संकलन – मिनाक्षी देशमुख.

सूर्यवंशी शूरवीर चरित्र

पितामह भीष्म चरित्र सर्व भाग


Exit mobile version